मनःपूर्वक खुशवंत

जीवन, मरण आणि त्या दरम्यान…


खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे


* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’

* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’

* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’

निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!


225.00 Add to cart

भूमिका


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.
केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल.
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक… भूमिका


300.00 Add to cart

भूमिका (डिलक्स आवृत्ती)


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.
केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल.
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक… भूमिका


300.00 Add to cart

सुहाना सफर और…

कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन-प्रवास


विजय पाडळकर


हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला.
सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली.
अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूँह फेरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…!
या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय… त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल.
प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध… ‘सुहाना सफर और…!’


Life and work of veteran lyricist in Bollywood – Shailendra! A reader can revisit the golden era of Bollywood music. Shailendra wrote all kinds of songs for successful films. It also tells about many behind the scene memories of various Hindi film songs. While reading about Shailendra, his life, struggles, how he carved his own niche in the industry, his passion of film making etc. This book is a kaleidoscope for film researchers and critics too.


340.00 Add to cart

सह्याद्रीचे वारे


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


माझा गेल्या तीस वर्षांचा जो अनुभव आहे त्यावरून मी असे पाहिले आहे की, कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात. बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते, असे माझे स्वत:चे मत आहे. आणखी ती जनता काही अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असेही नाही. आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे, हे या जनतेला पटविण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते. जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्यापुढेही राहणार आहे असे मी मानतो.”

-यशवंतराव चव्हाण


300.00 Add to cart

योग एक कल्पतरू

बी.के.एस. अय्यंगार


योगसाधना व योगासने यांच्या नित्याचरणाने शरीर निकोप होत जाते, तसेच मनही शुध्दतेच्या मार्गाला लागते. धारणा-ध्यान त्याला सदाचाराकडे झुकवते. आसन व प्राणायाम यांच्या नित्यपरिपाठाने मनुष्याच्या चित्तवृत्तीत बदल होतो. तो अंतर्मुख होऊन त्याचे विवेक विचार जागृत होतात. हे सर्व कसे घडू शकते, याचाच विचार योगमहर्षी श्री.बी.के.एस.अय्यंगार यांनी या पुस्तकात विविध अंगांनी केला आहे. याच एका साधनेत आपले अवघे आयुष्य व्यतीत करून श्री. अय्यंगार यांनी सिध्द केलेले हे पुस्तक म्हणजे जणू ‘योग-नवनीत’च होय. योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग दिग्दर्शित करणारे एकमेव परिपूर्ण पुस्तक.


250.00 Add to cart

आटपाट देशातल्या गोष्टी

 


संग्राम गायकवाड


समाजातील नीतिमत्ता कशी व्यक्त होते? एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत हे दाखवायचा एक उत्कृष्ट प्रयत्न लेखक करतो. वेगवेगळे लोक, त्यांचे आपापले दृष्टिकोन. त्यांच्या एकत्र नाचातून घडणारे समाजजीवन. उदाहरण आहे एका आयकर धाडीचे. मध्यमवर्गीयांना आवडणारी घटना. कोणी ‘मोठा’ ठेचला जातो आहे! पण असे होत नाही. कोणालाच फार समाधान न देणारे चित्र घडत जाते. उथळपणे ‘याला जीवन ऐसे नाव’ म्हणून गप्प बसावे का? की जॉन स्टाइनबेकसारखे There is just stuff people do म्हणावे ?

वाचकाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देत लेखक मंद स्मित देतो!

नंदा खरे


 

395.00 Add to cart

का चिंता करिशी

चिंतामुक्तीसाठीचा हमखास मार्ग


डॉ.राजेंद्र बर्वे


सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.

आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.

ताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.

डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.

या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.

त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.

हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल…
का चिंता करिशी ?

 

200.00 Add to cart

काही आत्मिक… काही सामाजिक


सानिया


लेखक जसजसे आपल्याला आवडू लागतात तसतसे त्यांच्या लेखनप्रक्रियेबद्दल, विचारशैलीबद्दल, त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीबद्दल, अनुभवांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता बळावते. खरं तर त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधून आपल्याला ते लेखक उलगडत असतात पण त्यांनीच जर त्यांच्या वैचारिक, भावनिक घुसळणीविषयी अनौपचारिक काही लिहिलं तर वाचकासाठी चार चाँदच!

सानिया यांनी गेल्या तीस वर्षात विविध विषयांवर आणि विविध निमित्ताने लिहिलेले असे काही लेख या लेखसंग्रहामध्ये समाविष्ट केले आहेत. पुस्तक साकारताना त्यातील काही लेखांचे पुनर्लेखन केले आहे. यात काही वैचारिक लेख आहेत, तर काही चिंतनपर… काही व्यक्तीचित्रणं, तर काही लेख म्हणजे लेखिकेने स्वतःशी केलेला निखळ संवाद… तर काही आहेत निव्वळ आठवणी! एखादा लेख समाजशास्त्र विशेषज्ञाने लिहावा इतक्या गंभीर धाटणीचा, तर प्रिय मैत्रीण गौरी हिला लिहिलेला लेख डोळ्यात अश्रू उभा करणारा! नामवंत लेखक मिलिंद बोकील यांची पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना पुस्तकात मोलाची भर घालते. खरं तर ही प्रस्तावना इतकी सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे की तिला समीक्षाच म्हणावं.

वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या लेखिका सानिया सहज साधलेल्या संवादातून, वाचकांसोबत एक नवं नातं निर्माण करून त्यांना या लेखन प्रवासात सहप्रवासी करतात.

एका आत्मिक व्यक्तित्वाची ओळख करून देणारा ललित लेखसंग्रह काही आत्मिक… काही सामाजिक


 

375.00 Add to cart

जुगलबंदी

अनुवाद : अवधूत डोंगरे


आज भारतीय राजकारणात महत्त्वाची राजकीय शक्ती म्हणून उदयाला आलेल्या भारतीय जनता पक्षाची पायाभरणी कुणी व कशी केली, १९८४च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन जागा मिळवणारा पक्ष पुढे चढत्या कमानीने कसा विस्तारत गेला, तसंच १९९८ ते २००४ या काळात आणि २०१४ सालानंतर सत्तेचा सोपान कसा चढला, या सर्व प्रश्नांचा वेध घेत ‘भाजप’च्या जडणघडणीचा विस्तृत पट या पुस्तकात राज्यशास्त्रज्ञ विनय सीतापती यांनी मांडला आहे. हे करताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी या त्यातल्या दोन प्रमुख नेत्यांच्या एकमेकांत गुंतलेल्या जीवनक्रमाचं सूत्र मध्यवर्ती ठेवलं आहे.

वाजपेयी व अडवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये व धारणांमध्ये भेद असतानाही त्यांनी सहा दशकं आवश्यक तो सांघिक दृष्टिकोन स्वीकारून काम केलं. त्यांच्यात सुप्त स्पर्धा असली तरी परस्परांविषयीचं बंधुप्रेम, आदर, व्यावसायिक एकजूट आणि ऐक्यावर भर देणारी विचारप्रवृत्ती यांमुळे ते एकमेकांसोबत राहिले. त्यांची ही भागीदारी कथन करताना लेखक मोदींपूर्वीचा भाजप कसा होता आणि तो का विजयी झाला, याचा सखोल ऊहापोह या पुस्तकामध्ये करतात.

खाजगी कागदपत्रं, पक्षांचे दस्तऐवज, नियतकालिकांतील लेख, वर्तमानपत्रं आणि दोनशेहून अधिक मुलाखती यांचे दाखले देत विपुल संशोधनावर आधारलेलं… भारतीय राजकारणात रस असलेल्या प्रत्येकाला मर्मदृष्टी देणारं पुस्तक… जुगलबंदी!


 

595.00 Add to cart

दुभंगलेले जीवन


अरुणा सबाने


एखादा निर्णय चुकीचा ठरतो आणि आयुष्य हातातून पूर्णपणे निसटू लागतं… या परिस्थितीतून काही जण सावरतात तर, काही जण उद्ध्वस्त होतात. ही गोष्ट अशाच उद्ध्वस्तांची आणि सावरलेल्यांचीही…

अनूला तिचं लग्न झाल्यानंतर कळत, तिचा नवरा शरद समलैंगिक आहे…. तिचं संपूर्ण भावविश्वच कोसळू लागतं… आणि पुढे आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यांची मुलगी सुचिता बापावरचा हा ‘ठपका’ घेऊन सासरी कायम जाच सहन करत राहते. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याच्या लढाईत एका वळणावर मानसिक आजाराची बळी ठरते. मात्र, शलाका तिला एक खंबीर साथ देते आणि त्यातून तिच्या आयुष्याला सकारात्मक वळण मिळतं… ती सावरते.

हे झालं कादंबरीचं कथासूत्र. पण या कादंबरीतून लेखिका अरुणा सबाने जो कळीचा प्रश्न उभा करतात, तो म्हणजे समलैंगिकता समाजमान्य असती तर, अनू काय किंवा शरद काय किंवा सुचिता काय… या तिघांच्याही आयुष्याची होरपळ वाचली नसती का? समलैंगिकता आणि मानसिक आजार अशा आजच्या महत्त्वाच्या समस्यांवर आणि निषिद्ध समजल्या जाणाऱ्या विषयांवर थेट पण संयत भाषेत चर्चा करणारी कादंबरी दुभंगलेले जीवन.


 

395.00 Add to cart

नाकारलेला

 


विलास मनोहर


महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची स्थिती-मनःस्थिती कशी होती आणि सध्या कशी आहे?

विलास मनोहर यांनी त्यांच्या ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’ या गाजलेल्या कादंबरीतून १९७५ ते १९९० दरम्यानच्या पंधरा वर्षांच्या काळातील या नक्षलप्रवण भागातील आदिवासींच्या स्थिती-मनःस्थितीचं जिवंत चित्रण केलं. त्या कादंबरीचा ‘सीक्वेल’ अर्थात, पुढील भाग म्हणजे सदर कादंबरी ‘नाकारलेला’.

या कादंबरीतून लेखकाने पुढे १९९० च्या दशकापासून तेथील परिस्थितीत आणि नव्या पिढीच्या आदिवासींमध्ये अनेक बदल कसे घडत गेले, त्याचा वेध ‘आदिवासी-केंद्री’ दृष्टिकोनातून घेतला आहे.

लेखक स्वतः दीर्घकाळ याच भागात वास्तव्यास असल्याने त्यांनी केलेलं समीप चित्रण विश्वासार्ह ठरतं.

एकीकडे, शासनाची विकासाबाबतची बदलती धोरणं आणि दुसरीकडे, नक्षलवाद्यांनी स्वीकारलेली लढाऊ नीती आणि या प्रक्रियेत सुरक्षादल व नक्षलवादी यांच्यामध्ये सापडलेल्या आणि सतत शकाग्रस्त, भयग्रस्त वातावरणात जगणाऱ्या सामान्य आदिवासींच्या जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण यात साधलेलं आहे. आज ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, जवान म्हणूनही भूमिका बजावणारे आदिवासी; खबरे, सावकार, पत्रकार; राजकीय नेते व ‘नक्षल दला’चे नेते आणि मूळ इथलाच पण मोठ्या शहरात सुस्थित जीवन जगणारा आधुनिक नायक लालसू अशा अनेक व्यक्तिरेखांच्या नजरेतून वस्तुस्थितीचं ३६० अंशात दर्शन घडवू पाहणारी कादंबरी “नाकारलेला


 

575.00 Add to cart

फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन


अनिल लांबा


हे पुस्तक वैयक्तिक गुंतवणूक-नियोजन, नियोजनाचे विविध पैलू उलगडून दाखवते. सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने, अशा भाषेत व उदाहरणं देत हे पुस्तक ‘फायनान्स’च्या विविध संकल्पना मुळातूनच समजावतं, तसेच गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यांचे फायदे-तोटे सांगत योग्य मार्गदर्शन करतं.

पुस्तकं काय समजून घेताना…?
कोणतं मार्गदर्शन करतं?

१)फायनान्सविषयी ‘बेसिक’ माहिती
२)वैयक्तिक ‘बॅलन्सशीट’ कशी कराल?
३)चक्रवाढ व्याज एक महाशक्ती
४)’शेअरमार्केट’मधील शिरकाव
५)म्युच्युअल फंडातील गुंतवणूक
६)पीपीएफ, एफडी असे गुंतवणुकीचे पारंपरिक पर्याय
७)क्रिप्टोकरन्सी, मनीमार्केट, रीट ( REIT( असे नवे पर्याय
८)गृहकर्जफेडीचे विविध कंगोरे
९)आयकरातील कर सवलती
१०)प्रामाणिकपणे कर भरण्याचे फायदे

सर्वसामान्यांचं जणू एक गुंतवणूक हँडबुक…फायनान्शिअल अफेअर्स ऑफ द कॉमन मॅन.

370.00 Add to cart

भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी


विजय गोखले


चीनच्या धूर्त धोरणीपणामुळे शिष्टाईच्या प्रांतात भारत चीनकडे – विशेषतः १९६२च्या युद्धानंतर संशयाच्या नजरेने पाहत आला आहे. असं असूनही या उभय देशांच्या संबंधांचं सखोल आकलन फार कमी वेळा मांडण्यात आलं. काही घटना-प्रसंगांमुळे तत्कालीन चर्चा-वादविवाद झाले, अजूनही ते होत असतात, पण त्याच्या खोलात फारसं कुणी जात नाही.

भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसंच चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेल्या विजय गोखले यांनी या पुस्तकात उभय देशांमध्ये झालेल्या वाटाघाटींचा, त्यामधील बदलांचा वेध घेतला आहे. भारत-चीन यांच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत सहा महत्त्वाच्या वाटाघाटींच्या खेळ्या झाल्या. या प्रदीर्घ वाटाघाटींच्या परिप्रेक्ष्यातून भारत-चीन संबंधांचा चिकित्सक ऊहापोह ते करतात, तसंच सद्यस्थितीकडेही पाहतात.

भारताशी शिष्टाईच्या पातळीवर वाटाघाटी करताना चीन कोणते डावपेच आखतो, कोणत्या क्लृप्त्या लढवतो आणि कोणती साधनं वापरतो, याचा शोध गोखले पुस्तकात घेतात. त्याचा फायदा पुढील काळातील वाटाघाटींमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना व्हावा, तसंच नागरिकांमध्ये या विषयाबद्दल जनजागृती व्हावी, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सातत्याने बदलणाऱ्या भारत-चीन संबंधांचा विश्लेषणात्मक मागोवा घेणारं पुस्तक… भारत-चीन संबंधांची प्रदीर्घ खेळी


 

300.00 Add to cart

महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता

 


[taxonomy_list name=”product_author” include=”4675″]


महात्मा गांधी आणि स्त्री-पुरुष समता … दैनंदिन जगण्यातील घरकामाची वाटणी, स्वयंपाक, पती व्यसनी असणे, आळशी असणे, वर्चस्व गाजवणारा असणे, विवाहानंतर मुलीच्या आई-वडिलांची भूमिका अशा अनेक प्रश्नांवर गांधीजींनी आपली मते मांडली आहेत व ती सारी मते पितृसत्ताक रचनेच्या विरोधी आहेत व स्त्री-पुरुषांच्या सर्वंकष समानतेवर आधारलेली आहेत. स्त्रीच्या स्वतंत्र व स्वायत्त व्यक्तित्वाचे मूल्य गांधींच्या विवेचनाचा आधार आहे हे यातून वारंवार स्पष्ट होते. शिवूरकर यांनी दिलेल्या दाखल्यांमुळे गांधी आधुनिक नाहीत असे आग्रहाने सांगणाऱ्यांना गांधीचा आधुनिक मूल्यांचा आग्रह परस्पर उत्तर देणारा आहे… …निशा शिवूरकर या पेशाने वकील असल्याने त्यांच्या लिखाणातील युक्तिवादावर त्याचा प्रभाव जाणवतो. अर्थातच इथला त्यांचा युक्तिवाद प्रतिस्पर्ध्याला खोटे ठरवण्याच्या संदर्भातील नाही. कोणालाही खोडून काढणे किंवा निरुत्तर करणे हे त्यांच्या लेखनाचे उद्दिष्टच नाही. त्यांच्या वाचनातून, चितनातून, मननातून त्यांना जाणवलेले गांधी त्यांनी सुसंगतपणे मांडले आहेत. समतेच्या संदर्भात आणि विशेषतः स्त्री-पुरुषांच्या समतेसंदर्भात तिचे सर्व पैलू त्यांनी विचारात घेतले आहेत. त्यांच्या निष्कर्षांना गांधीवचनांचा भक्कम आधार आहे. स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततिनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यावरच्या लिखाणातून त्यांनी ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. या पुस्तकाचे योगदान यातच सामावले आहे….

किशोर बेडकीहाळ (प्रस्तावनेतून…) ज्येष्ठ विचारवंत

395.00 Add to cart

माइंडफुलनेस

वर्तमानक्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना.


डॉ.राजेंद्र बर्वे


सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची!

पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुधार्य डॉ. राजेंद्र बर्वे.

आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.



200.00 Add to cart
1 31 32 33 39