362 | 978-93-86493-33-0 | Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका | Atul Kahate | अतुल कहाते | देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं… एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश… मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान… व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार… विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण… जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील — कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली, कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला, तर कधी थेट आक्रमणंच केली… सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा ‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’ अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून परखड चिकित्सा केली आहे. ‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’, ‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज… ‘युद्धखोर अमेरिका’! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 335 | 22 | 14 | 2 | 400 |
The book covers all the wars instigated by America.
|
Informative | माहितीपर | Political | राजकीय | 340 | YudhakhorAmerica | Yuddhkhor AmericaBC.jpg |
यशवंतराव चव्हाण संच
३ बहुमोल पुस्तकांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.