362 | 978-93-86493-33-0 | Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका | Atul Kahate | अतुल कहाते | देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं… एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश… मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान… व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार… विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण… जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील — कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली, कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला, तर कधी थेट आक्रमणंच केली… सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा ‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’ अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून परखड चिकित्सा केली आहे. ‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’, ‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज… ‘युद्धखोर अमेरिका’! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 335 | 22 | 14 | 2 | 400 |
The book covers all the wars instigated by America.
|
Informative | माहितीपर | Political | राजकीय | 340 | YudhakhorAmerica | Yuddhkhor AmericaBC.jpg |
असा घडला भारत
१९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
संपादन : मिलिंद चंपानेरकर
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
Reviews
There are no reviews yet.