362 | 978-93-86493-33-0 | Yuddhakhor America | युद्धखोर अमेरिका | Atul Kahate | अतुल कहाते | देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं… एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश… मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान… व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार… विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण… जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची अशी कितीतरी उदाहरणं देता येतील — कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली, कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला, तर कधी थेट आक्रमणंच केली… सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा ‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’ अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत. त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून परखड चिकित्सा केली आहे. ‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’, ‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’ अशी ओळख असलेल्या अमेरिकेची आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज… ‘युद्धखोर अमेरिका’! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 335 | 22 | 14 | 2 | 400 |
The book covers all the wars instigated by America.
|
Informative | माहितीपर | Political | राजकीय | 340 | YudhakhorAmerica | Yuddhkhor AmericaBC.jpg |
भारत : समाज आणि राजकारण
यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन
[taxonomy_list name=”product_author” include=”379″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”1076″]
आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.
Reviews
There are no reviews yet.