375 | 978-93-86493-58-3 | Swayampakshala | स्वयंपाकशाळा | पदार्थ रुचकर होण्यासाठी व त्यातील पोषणमूल्य जपण्यासाठीचे शास्त्रीय धडे | Dr. Varsha Joshi | डॉ. वर्षा जोशी | स्वयंपाक म्हणजे कला आणि विज्ञान यांचा सुरेख मेळ घालून केलेली कृती, हे एकदा पटलं की, त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करता येतात आणि विविधप्रकारे नावीन्यही आणता येतं. थोडा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, एखादा पदार्थ जास्तीतजास्त चविष्ट कसा होईल याचा विचार करता येईल आणि एखादा पदार्थ बिघडण्यामागचं कारणही समजून येईल. डॉ. वर्षा जोशी यांनी या पुस्तकाद्वारे अत्यंत सोप्या भाषेत स्वयंपाकघराची ‘शास्त्रीय सफर’ घडवून आणली आहे. पुस्तकात तीन विभाग आहेत… पहिल्या भागात… जेवणातील पदार्थ किंवा सणासुदीला बनवले जाणारे पदार्थ यांच्या घडण्या-बिघडण्यातलं गुपित, भाज्या करताना घ्यायची काळजी, स्वयंपाक करताना होणाऱ्या चुका, बिघडलेले पदार्थ सुधारता येतील अशा युक्त्यादुसऱ्या भागात… रोजच्या आहारातल्या विशिष्ट ऋतुत मिळणाऱ्या आणि महत्त्वाच्या अशा भाज्यांचं पोषणमूल्य, त्यांचं आहारातील महत्त्वतिसऱ्या भागात… फळांचं आहारातील महत्त्व, फळांमधील पोषणमूल्यं, कोणत्या वयोगटाने व विशिष्ट आजार असलेल्या व्यक्तींनी कोणती फळं खावीत याबद्दल मार्गदर्शनअगदी रोजचा वरण-भात करायचा म्हटला तरी तो रोज सारखाच होईल याची शाश्वती नसते. अशा वेळी थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून स्वयंपाक केल्यास रुची, पोषणमूल्य, चुकांची दुरुस्ती असं सर्व काही साधता येईल. ‘आधुनिक युगातील सुगरण’ होण्यासाठी शास्त्रीय धडे देणारी… डॉ. वर्षा जोशींची स्वयंपाकशाळा! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 144 | 21.5 | 14 | 0.8 | 200 | Utility | उपयुक्त | Recipe | पाककला | Science | विज्ञान | 180 | Swayampakshala | SwayampakshalaBC.jpg |
सुरुवात एका सुरुवातीची
वेडीबाभळीपासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग… या प्रयोगाची चित्तवेधक कथा!
[taxonomy_list name=”product_author” include=”423″]
तसं पाहिलं तर हे पुस्तक नाही, एक प्रयोग आहे. या प्रयोगासाठी प्रयोगशाळा कशी सिद्ध केली गेली याचं ते आत्मचरित्रात्मक निवेदन आहे. बहुतेक आत्मचरित्रांमध्ये ‘आत्म’ म्हणजे ‘मी’ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. परंतु प्रफुल्ल कदम यांच्या आत्मचरित्रात मुख्य भूमिका आहे ‘वेडीबाभळीची’. त्या नायिकेचा म्हणजे वेडयाबाभळीचा परिसर आहे ग्रामीण महाराष्ट्राचा. मात्र प्रयोग आहे जागतिक स्तरावर परिणाम घडविणारा. या आत्मचरित्राला उद्दिष्ट आहे ऊर्जाक्रांतीचे – जी जलक्रांती व कृषीक्रांती समवेतच साध्य होऊ शकते… …पूर्णपणे प्रतिकूल वातावरणातही प्रयोग करण्यासाठी लागते दुर्दम्य जिद्द. जिद्दीला भांडवल लागत नाही. उद्दिष्ट निश्चित असेल, विचार पक्का असेल आणि जिद्द असेल तर सर्व अडचणींवर मात करता येते. अगदी नकारात्मक विचार करणार्यांचा विरोधही मोडून काढता येतो आणि मतलबी मंडळींचे खेळही थोपविता येतात. खरं म्हणजे महाराष्ट्रात हजारो तरुण असे आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे, परंतु दिशा नाही, कार्यक्रम नाही वा मार्गदर्शन नाही. त्यांना हे पुस्तक एक ‘गाईड’ ठरेल. -कुमार केतकर
Reviews
There are no reviews yet.