200 | 978-93-80361-81-9 | Sharyat Shikshanachi | शर्यत शिक्षणाची | मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक अभिनव विचार-द्दष्टी… | V. Raghunathan | वी. रघुनाथन | Pounima Kundetkar | पोर्णिमा कुंदेटकर | मुलांचं शिक्षण म्हणजे वेगाची शर्यत नसून तिचं साधर्म्य मॅरेथॉन शर्यतीशी नक्कीच आहे! पुस्तकाचे लेखक व्ही. रघुनाथन या पुस्तकाव्दारे पालकांना जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला प्रवृत्त करतात. मुलांच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुलांना वेगाच्या ‘शर्यतीत जुंपण्यापेक्षा’ त्यांना ‘लंबे रेस का घोडा’ होण्यास तयार करणे अधिक योग्य आहे. एखादी गोष्ट साध्य करणं मुलांना शक्य न झाल्यास पालक स्वत:च नाउमेद होतात. वास्तविक अशा वेळी खचून न जाता ती संधी मुलांचं व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य विकसित करण्यासाठी वापरली तर ते त्यांच्या फायद्याचंच होईल. अकारण लादल्या गेलेल्या अभ्यासातून चढाओढीने एखाद्या ठिकाणी पोहचण्यापेक्षा तुमच्या आयुष्याचा एखाद्या वेगळ्या वाटेने झालेला प्रवास नक्कीच अधिक आनंददायक असेल. अशा प्रकारचा अनुभव घेऊन आयुष्य पुरेपूर जगणाऱ्या काही प्रसिध्द आणि सर्वसामान्य अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींची उदाहरणंही पुस्तकात दिली आहेत. एन.आर.नारायणमूर्ती, डॉ.कलाम, अंजीरेड्डी, अश्विनी नचप्पा, ईला भट्ट यांचा या प्रसिध्द व्यक्तींमध्ये समावेश आहे. मग तुम्ही तुमच्या मुलाला आयुष्याच्या शर्यतीत वेगाने भरधाव पळायला लावणार की जीवनाचा आनंद घेत शर्यत पूर्ण करू देणार? एक विचार-दृष्टी देणारं पुस्तक…शर्यत शिक्षणाची… | Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 175 | 21.6 | 14 | 0.8 | 220 |
Education is not a small 100m race. It is a Marathon. Alongwith scoring good marks in exams, overall understanding, personality development, and many other things matter. The book helps parents and teachers to guide students for overall educational development.
|
Educational | शैक्षणिक | 160 | Sharyat Shikshanachi.jpg | Sharyat Shikshanachi_BackBC.jpg |
माझ्या विद्यार्थी मित्रांनो (Hard Bound)
स्व.यशवंतराव चव्हाण यांची दीक्षान्त समारंभातील भाषणे
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.
Reviews
There are no reviews yet.