336 | 978-93-86493-20-0 | Paramveer-Gatha | परमवीर-गाथा | सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर-गाथा | Rachana Bisht-Ravat | रचना बिश्त-रावत | Bhagwan Datar | भगवान दातार | परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा ! कधी २०००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो…या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं.आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील. या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात. कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे…परमवीर-गाथा! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 216 | 21.5 | 14 | 1 | 240 |
Both gripping and inspiring, Parmveer-Gatha tells stories
of our bravest soldiers, all of whom won Param Veer Chakra, India’s greatest military honour. Author Rachana Bisht-Rawat sketches vivid characters of these 21 soldiers. She visited the towns and villeges of these soldiers, talked to their near and dear ones including their parents, friends, wives, children, officers and so on. Translated by senior journalist Bhagwan Datar, these stories from the battlefield, touch your heart emotionally and at the same time, they are inspiration personified. |
Informative | माहितीपर | 200 | Paramvir Gatha | ParamveergathaBC.jpg |
यांनी घडवलं सहस्रक (१००१ – २०००)
गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्तींचा वेध…
संपादन : मिलिंद चांपानेरकर , सुहास कुलकर्णी
या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.
Reviews
There are no reviews yet.