275.00

गोल्पे विभोर

विश्वाच्या उत्पत्तीच्या रंजक इतिहासापासून भविष्यात विश्व कसं असेल इथपर्यंत


बाणी बसू याचा जन्म ११ मार्च १९३९ रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, अनुवादिका, समीक्षक, बालसाहित्यिक आणि प्राध्यापिका म्हणून त्या बंगालमध्ये ओळखल्या जातात. ‘आनंदमेला' आणि 'देश' या नियतकालिकांमधून त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात केली. त्यांच्या अनेक कथा व कादंबऱ्यांवर चित्रपट व टीव्ही सिरिअल्स बनवल्या गेल्या आहेत. त्यांना ‘ताराशंकर अवॉर्ड’, ‘आनंद पुरस्कार', 'सुशीलादेवी बिर्ला पुरस्कार', ‘साहित्य सेतू' आणि ‘साहित्य अकादमी' असे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

अनुवाद :

सुमती जोशी यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४९चा. त्यांचं वास्तव्य मुंबई येथे आहे. दादरच्या आय.इ.एस. मुलींच्या शाळेतून त्या प्रथम क्रमांकाने एस.एस्सी. उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मायक्रोबायॉलॉजी या विषयात मुंबई विद्यापीठातून बी. एससी. केलं आहे. एन.टी.एस. च्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र या विषयाचं गेली एकवीस वर्षं अध्यापन करत आहेत. वयाच्या अठ्ठावनाव्या वर्षी त्यांनी बंगाली भाषा शिकायला सुरुवात केली. दर वर्षी एक याप्रमाणे आद्य, मध्य आणि अंत्य या तीन परीक्षा विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाल्या. शेवटच्या परीक्षेत म्हणजे वयाच्या साठीत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. २०१० सालापासून त्यांनी बंगाली साहित्याचा अनुवाद करण्यास सुरुवात केली. आधुनिक बंगाली साहित्यातले गेल्या अर्धशतकातले उत्तम लेखक आणि त्यांच्या कलाकृतींचा आनंद मराठी वाचकांना घेता यावा हा त्यांचा अनुवाद करण्यामागील उद्देश आहे. आजपर्यंत त्यांनी अनुवादित केलेले अनेक कथा संग्रह, कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. 'उत्क्रांती' या पुस्तकासाठी त्यांना विज्ञान विभागातला राज्य पुरस्कारही (२०१०) प्राप्त झाला आहे.


बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर



 

978-93-92374-98-0 Golpe vibhor गोल्पे विभोर बाणी बसू लिखित बंगाली कथा Sumati joshi सुमती जोशी बाणी बसू या बंगालमधील एक प्रतिथयश लेखिका, कवयित्री, समीक्षक आणि अनुवादिका आहेत. त्या अनेक वर्षं इंग्रजीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बसू यांच्या आजवर अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि लहान मुलांसाठीचं लेखन प्रसिद्ध झालं आहे. ‘खनामिहिरेर ढिपी’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रत्येक लेखकाची स्वतःची अशी वेगळी शैली असते. बसू यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लेखन कधीही एकसूरी वाटत नाही. त्यांच्या लेखनात भाषेची आणि कल्पनेची पुनरुक्ती दिसत नाही. त्या जेव्हा लेखन करतात तेव्हा त्यांच्या मनात वाचकांच्या इच्छापूर्तीचा विचार नसतो. वाचकांना आवडेल, असं लेखन करणं त्यांना अमान्य नाही; पण निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या मार्गाचा अवलंब त्या करत नाहीत. ‘गल्पेर बागान’ आणि ‘गोल्पे विभोर’ या दोन्ही कथासंग्रहात याचा प्रत्यय येतो. कथांमधील परावर्तित झालेली त्यांची विचारांची सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता यामुळे वाचकाला लेखिकेच्या प्रतिभासंपन्नतेचं आणि संवेदनक्षम मनाचं दर्शन घडतं. वाचकांना गुंतवून ठेवणारे आणि बंगाली, संस्कृतीची मोहवती झलक देणारे दोन कथासंग्रह… गल्पेर बागान व गोल्पे विभोर Papar back book Rohan Prakashan Marathi 192 अंतरभारती litreture कथासंग्रह 275
Weight 300 g
Dimensions 21.7 × 14.1 × 1.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.