442 | 978-93-89458-12-1 | Corana Kalatil Manasik Arogya | करोना काळातील मानसिक आरोग्य | मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून केलेलं सोपं मार्गदर्शन | Dr. Vijaya Phadnis | डॉ. विजया फडणीस | अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपण अनेक बाबतीत सावध होतो. जसं की शारीरिक आरोग्य, आर्थिक प्रश्न…पण एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होतं, ते म्हणजे मानसिक आरोग्य…
परिस्थितीचे कळत-नकळतपणे मनावर परिणाम होत असतात. करोनाच्या आपत्तीमुळे नोकरी-व्यवसायावर गंडांतर, शाळा-कॉलेज बंद, भेटी-गाठी बंद अशा वातावरणात मनावर नकारात्मक परिणाम होणारच…पण ते थेटपणे कळतातच असं नव्हे…मग चिडचिड, राग, नैराश्य, वैफल्य असं सर्व होणं स्वाभाविक…त्या अनुषंगानेच अनेक मुद्द्यांचा यात ऊहापोह केला आहे. जसे की…कोणते मानसिक प्रश्न उद्भवू शकतात? त्यातून कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? या बदलांना सामोरं कसं जावं? मानसिकता कशी बदलावी? सकारात्मकता कशी बाणवावी? या सर्वांवरचे उदाहरणांसह उपाय, नेहमी पडणारे प्रश्न व त्यांची उत्तरं (FAQs). सध्य: परिस्थितीचा स्वीकार करून, उत्साह व उमेद निर्माण करणारं मार्गदर्शक पुस्तक… ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य ! डॉ. विजया फडणीस : शिक्षणाने आणि पेशाने मानसतज्ज्ञ. समुपदेशक म्हणून अनेक वर्र्षांचा अनुभव… वर्तन, व्यक्तिमत्त्व, करिअर, शिक्षण, वैवाहिक जीवन हे समुपदेशनाचे प्रामुख्याने विषय. मानसोपचार, मनोबल, मुलांचं भविष्य या विषयांवर विपुल लेखन. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 84 | 18.3 | 10.8 | 0.6 | 60 | Psychology | मन:स्वास्थ्य | Health | आरोग्य | 80 | CoronakalatilManasikAarogyacover | Corona kalatil Maasik AarogyaBC.jpg |
आरोग्यदायी जीवनसत्त्वे
उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण
[taxonomy_list name=”product_author” include=”394″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”375″]
आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अॅसिडस् शरीराला आर्श्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा… ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.
Reviews
There are no reviews yet.