81-86184-85-0 | Anakhi Kanokani | आणखी कानोकानी | Ashok Jain | आणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील . | book | Rohan Prakashan | Marathi | 168 | 100 |
मनःपूर्वक खुशवंत
जीवन, मरण आणि त्या दरम्यान…
खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे
* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’
* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’
* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’
निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!
Reviews
There are no reviews yet.