81-86184-85-0 | Anakhi Kanokani | आणखी कानोकानी | Ashok Jain | आणखी कानोकानी ‘ कलंदर’च्या खुमासदार शैलीतील लिखाणाचं पहिलं संकलन ‘ कानोकानी ‘ आणि आता हे दुसरं ‘ आणखी कानोकानी ‘ . या संग्रहात ‘ कलंदर’ने आचार्य अत्रे , पु.ल.देशपांडे , वि . स . खांडेकर , कुसुमाग्रज , जी . ए . कुलकर्णी , मंगेश पाडगावकर अशा प्रथितयश साहित्यिकांच्या संदर्भात खुसखुशीत लेख लिहून ‘ साहित्यिक खळखळाट ‘ निर्माण केला आहे , तर साहित्यक्षेत्रातील अनेक घटनांची , प्रसंगांची विडंबनात्मक उठाठेवही केली आहे . पुस्तकात कलंदराने आर . के . लक्ष्मण ते मधुबाला अशा कलाक्षेत्रातील अनेकांच्या गुणावगुणांवर मिस्किल लिखाण केले आहे , ‘ नाट्यवर्तुळाचा कानोसा घेतला आहे , मराठी भाषेबाबतची अनास्था चव्हाट्यावर आणली आहे आणि ‘ राजकीय कोलाहला’चा मार्मिक उपहासही केला आहे . पहिल्या ‘ कानोकानी’ला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्मयाचा पुरस्कार प्राप्त झाला होता . त्या संग्रहातील तिरकस बाणांनी वाचकांची वाहवा मिळविली . आता ‘ आणखी कानोकानी’मधील आपल्या लक्ष्यांवर ‘ ना – दुखापत ‘ तत्त्वावर सोडलेली निर्विष क्षेपणास्त्रं ‘ विनोदी साहित्याचा अवकाश निश्चितच प्रकाशमान करतील . | book | Rohan Prakashan | Marathi | 168 | 100 |
यशवंतराव चव्हाण संच
३ बहुमोल पुस्तकांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”456″]
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
Reviews
There are no reviews yet.