अयोध्या ते वाराणसी
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
प्रकाश आकोलकर
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
भाजपच्या प्रवासाची आँखों देखी हकीगत
प्रकाश आकोलकर
भाजपच्या वाटचालीचा समग्रपणे मागोवा घेणारं मराठीतलं महत्वाचं पुस्तक… अयोध्या ते वाराणसी !
सिलिकॉन व्हॅली’तली साहसी फसवणूक
अतुल कहाते
स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला … या ‘ इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता … पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण , डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी …. थेरॅनॉस !
कुख्यात चार्ल्स पॉन्झीची कुकर्म कथा
अतुल कहाते
गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘ भन्नाट ‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट .. पॉन्झी स्कीम्स !
जयप्रकाश प्रधान
■ कोणत्या देशांची भटकंती आहे या पुस्तकात ?
४ जॉर्जियामधील ऑटम कलर्स, तेथील प्राचीन अवशेष, स्टॅलिनचं जन्मगाव
अझरबैजानमधील इचेरी शेहरसारखा जुना भाग आणि दुसरी दुबई होण्याच्या मार्गावरील नवा भाग ● अर्मेनिया हा विविध युद्धांना बळी पडलेला चिमुकला देश
★ नागोनों काराबाख हा डोंगराच्या कुशीत विसावलेला नयनरम्य देश
युरोपची सांस्कृतिक राजधानी समजला जाणारा स्पेनमधील मलगा प्रांत आणि स्मार्ट सिटी बार्सिलोना
● प्राचीन अवशेषांनी नटलेला ग्रीस
• फ्रान्स आणि स्पेनच्या सीमांमध्ये लपलेला टिकलीएवढा देश ‘अँडोरा’
■ कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ?
• स्पेनमधले बॅलेअरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे,
• ११५ लहान-मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स,
● जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई,
• ग्रीस मधली पांढरी निळी बेट, v लहान-मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून
झालेला व प्राचीन वारसा असलेला इंडोनेशिया १५ नयनरम्य निसर्ग सौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेट…..
प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार
डॉ. विजया फडणीस
आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .
मिलिंद चंपानेरकर
नीलिमा रवि
दोन भिन्न आकृतिबंधांतील दीर्घकथा
करोना मुळे प्रथम ‘लॉकडाउन’ घोषित केला गेल्यावर पहिल्या आठ दिवसांत शहरातील सामान्य नागरिकांच्या मनाची झालेली घालमेल ते सैरभैर होऊन गावाकडे निघालेल्या विस्थापित श्रमिकांची झालेली परवड अशा विविध घडामोडींची दोन भिन्न आकृतिबंधामधून नोंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन दीर्घकथा .अचानक निर्माण झालेल्या असामान्य स्थितीमुळे परस्परांतील विश्वास वाढतो की , संदेह बाजूला ठेवण्यास माणसं सहजप्रवृत्त होतात, त्याचा वेध घेऊ पाहणारी संदेहकथा … लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य.
पक्ष्यांचे थवे काही एक सामंजस्याने मार्गक्रमण करत असतात. ” त्या आठ दिवसांत जनजीवनात अचानक संभवलेल्या बदलांनी तेही सैरभैर झाले. स्थलांतरित, नागरी, जंगली, निवासी अशा विविध पक्ष्यांनी मिळून लोकशाही पद्धतीने समिती गठित केली आणि त्या बदलांचा धांडोळा’ घेतला ! पक्षीगणाच्या नजरेतून दिसून आलेली स्थिती चितारणारी विहंगावलोकनी रूपककथा …
पक्षी – चंक्षूकरोनागस्ती तून करोनागस्ती .
१९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
संपादन : मिलिंद चंपानेरकर
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
१९४७ पासूनच्या घटना-घडामोडींतून उलगडलेला स्वतंत्र भारत
संपादक : मिलिंद चंपानेरकर
सुहास कुलकर्णी
भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे.
गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
भारतीय लष्कराचा मानबिंदू
[taxonomy_list name=”product_author” include=”455″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”430″]
चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत पाच युध्दांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकीर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्करप्रमुखाचं हे प्रेरणादायी व रोमहर्षक चरित्र!
भारताचे माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि विशेषत: त्यांच्यामधील नेतृत्वगुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शुभी सूद हे माणेकशा यांचे निकटवर्ती सहकारी. त्यांच्या सोबत काम करताना आलेल्या अनुभवांमधून माणेकशांचे व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व याचं चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे.
युध्दरणनितीची उत्तम जाण, अभ्यास, व्युहरचनेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुध्दी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय वर्तन अशा माणेकशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्तींचा वेध…
संपादन : मिलिंद चांपानेरकर , सुहास कुलकर्णी
या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.
‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा
डॉ. वर्षा जोशी, डॉ. हेमा क्षीरसागर
भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’
जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद
बी.के.एस. अय्यंगार
अनुवाद : राम पटवर्धन
योगसाधकांसाठी हे पुस्तक म्हणजे योगविद्येची जणू गीताच !
१९३६पासून बी.के.एस. अय्यंगार यांनी जनसामान्यांना योगविद्येचे धडे दिले. जगभर प्रवास करून त्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे योगविद्येचा विविध देशात प्रसार केला. या पुस्तकात त्यांनी ‘योग’ म्हणजे काय, त्या मागचं तत्त्वज्ञान कोणतं व त्याची व्याप्ती किती याविषयी समर्पक चर्चा केली आहे.
पुस्तकात आसनांविषयी सखोल विवेचन करून त्या त्या आसनांची छायाचित्रं दिली आहेत. एवूâण २०० आसनं आणि बंध व १४ श्वसनाचे प्रकार (प्राणायाम) विस्तृतपणे दिले आहेत. पुस्तकात त्या त्या जागी दिलेल्या ६०० छायाचित्रांच्या आधारे तुम्ही कोणतंही आसन शिक्षकाच्या मदतीशिवाय बिनधोक करू शकता.
याशिवाय योग, नाडी, चक्र आणि कुंडलिनी या योगशास्त्रातील महत्त्वाच्या संज्ञांच्या व्याख्या देऊन त्यावर थोडक्यात भाष्यही केलं आहे. परिशिष्टामध्ये विशिष्ट आजारांवर प्रभावी ठरणार्या आसनांची यादीच दिली आहे. तसेच योगविद्या आत्मसात करण्यामध्ये विशेष रुची असणार्या विद्यार्थ्यांसाठी ३०० आठवड्यांचा एक प्रदीर्घ कोर्सच आखून दिला आहे. या कोर्सची विभागणी तीन भागांमध्ये केली आहे.
प्रारंभी सोप्या आसनांपासून सुरुवात करत थोडी अवघड आसनं आणि नंतर कठीण आसनं टप्प्याटप्प्याने कशी करावीत याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं हे पुस्तक… योगदीपिका !
<
Yoga for Health and Well-being
B.K.S. Iyengar
Yoga is a complete science with universal value system and a comprehensive philosophy that promotes the health and harmony of an individual in relation to society at large.
The practice of yoga imparts health, well-being, strength of character and peace of mind even to a lay practitioner. Integrity, courage, fearlessness, focus, sincerity, a pleasing personality and self-awareness are qualities bestowed upon the practitioners. It shows the path of self-realization for the more advanced Sādhaka.
The book is as relevant for the common man as for the highly evolved seer. It gives a very detailed methodology for over 45+ āsana s with its variations and various modifications to experience the desired effects; sequences and practical hints for all kinds and levels of practitioners. It includes the use of wall, strap, table, stool, bolsters, blankets found in all households to give the desired effects in the āsana s. There are 7 Chapters dedicated to Śavāsana, Prānāyāma concluding with Dhyāna.
BKS Iyengar is considered one of the foremost Yoga teachers in the world. He is the author of over 30 books on yoga and ‘Ārogya Yoga’ will surely lead the reader to a healthy life.
संवादातून ओळख संशोधकांची आणि त्यांच्या संशोधनांची!
[taxonomy_list name=”product_author” include=”364″]
गप्पांमधून, संवादामधून संशोधकांची, त्यांनी लावलेल्या शोधांची आणि त्यांच्या आयुष्यातील गमतीजमतींची माहिती ‘शेअर’ करण्याचा क्लब म्हणजे ‘युरेका क्लब’!
या क्लबची भन्नाट आयडियाही शाल्मली, ईशा, अनिकेत, प्रणव आणि विराज अशा तुमच्यासारख्या मुलांचीच! या मुलांबरोबर या क्लबमध्ये आहे, एक ताई. तिने सायन्समधून एम.एस्सी. केलंय. मुलांच्या कलाने शिकवायची विलक्षण हातोटी तिच्याकडे आहे. मुलं तिच्याशी संशोधकांबद्दल बोलतात, प्रश्न विचारतात. कधी इंटरनेटचा वापर करून, तर कधी एनसायक्लोपीडिया वाचून शास्त्रज्ञांची माहिती गोळा करतात. इतकंच नाही, तर मोठ्या माणसांसारखी ‘प्रेझेंट’ही करतात! जिथे मुलं अडतात किंवा ताईला जास्तीची माहिती द्यावीशी वाटते तिथे ताई सहजसोप्या शब्दांत, न चिडता किंवा न ओरडता ती समजावून सांगते! आणि मग या संवादातून मिळत जाते युक्लिड, कोपर्निकस, आर्किर्मिडीज, न्यूटन, मेरी क्यूरी, आइनस्टाइन यांसारख्या २६ संशोधक आणि त्यांच्या शोधकार्याची माहिती!
ताई व मुलांच्या या ‘इनोव्हेटिव्ह’ गप्पांमधून तुम्हालाही उलगडत जातील अनेक संशोधनांमधली मर्मं आणि मग तुमच्याही तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतील– ”युरेका… युरेका… युरेका क्लब!”
भविष्यकालीन विज्ञानाचा वेध घेऊन विद्यार्थ्यांना केलेलं बहुमोल मार्गदर्शन
[taxonomy_list name=”product_author” include=”576″]
सहलेखक : [taxonomy_list name=”product_author” include=”510″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]
भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके ‘शिक्षक’ ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विख्यात तरुण लेखक सृजन पाल सिंग यांनी सखोल संशोधनातून हे पुस्तक साकारलं आहे. यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतुलनीय कामगिरीने आपण काय साध्य केलं आहे व त्याचे आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहेत, याची रंजक माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातून त्यांनी भविष्यकालीन विज्ञानाचा, त्यातील क्षेत्रांचा वेध घेऊन त्याविषयीचं व्यापक चित्र आजच्या विद्यार्थ्यांपुढे उभं केलं आहे. तसंच भविष्यात विज्ञानात मोठ्या प्रमाणावर विकसित होणार्या रोबोटिक्स, एरोनॉटिक्स (विमानविद्या), स्पेस सायन्स (अंतराळ विज्ञान), न्यूरोसायन्स (मेंदू विज्ञान) यांसारख्या ‘आउट ऑफ द बॉक्स’ करिअर्सचा सहजसोप्या भाषेत, पण सखोल परिचय करून दिला आहे.
मी अनुभवलेलं एक अभूतपूर्व स्वप्न
आर. आरवमुदन
सहलेखक :गीता आरवमुदन
अनुवाद :प्रणव सखदेव
डॉ. विक्रम साराभाई यांनी ६०च्या दशकात काही तरुण इंजिनिअर्सना आणि शास्त्रज्ञांना आपल्या चमूत घेऊन एक बीज रोवलं होतं. त्यात रामभद्रन आरवमुदन हा पंचविशीचा तरुणही होता. त्यांच्यापुढे आव्हान ठेवलं होतं ते एक रॉकेट लाँचिंग केंद्र उभारण्याचं. आणि या तरुणांनी हे आव्हान स्वीकारून अशक्य वाटणारं हे काम शक्य करून दाखवलं होतं. न केवळ भारतीयांसाठी, तर जगासाठीही ते एक आश्चर्य होतं… आणि मग द्रष्टे शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचं स्वप्न साकारू लागलं – ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’चं अर्थात ‘इस्रो’चं!
या पुस्तकात आरवमुदन ‘इस्रो’ कशी घडत गेली याचे तपशील देऊन त्यासाठी हातभार लागलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्याही सांगतात. तसंच ‘इस्रो’ने राबवलेले प्रकल्प कसे साकारत गेले, त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट घ्यावे लागले, किती अपयशं झेलावी लागली याची रोचक माहितीही ते देतात. रॉकेट लॉंचिंग स्टेशन ते ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प राबवणाऱ्या ‘इस्रो’चा हा वटवृक्ष कसा उभारत गेला याचं रंजक कथन पुस्तकातून आपल्यापुढे येतं.
स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठ़ी आपलं तन-मन-धन अर्पिणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडिया’ कहाणी…इस्रो : झेप नव्या क्षितिजाकडे !