एक ड्रीम…,मायला


[taxonomy_list name=”product_author” include=”4238″]


फुल फोकसमध्ये तो बाप्या उभा आहे समोर चबुतऱ्यावर.  काय म्हणून ?” लोकमान्य टिळक ते, भडव्या.  ” तेच ते !शहरात शिरू शकतात ते ? लालूच्या गावाहून आलेल्या मालीशवाल्यांना माहिताय ते कोण आहेत, त्यांना असं गावाबाहेर का काढलंय ते ? “मला असं शहराबाहेर उभं राह्यचं नाहीय. इटस् टाईम आय एन्टर द गेम बॉईज ! मी राडा करणारेय, भेंच्योद. शहर वाचवू शकतील अशा सगळ्याच बाप्यांना हिजड्यांनी शहराबाहेर काढलंय. चबुतऱ्यावर चढवलंय. आता कोणीही कुठेही घुसावं आणि राडा करावा. सातपुतेला मारावं, गरोदर बायकांना मारावं, पोरांना, म्हाताऱ्यांना उडवावं. जाळावं. बॉम्बच्या माळा लावाव्यात. मान वर करून कोणी बघतसुद्धा नाही . चार लाख सदतीस हजार नऊशे ही चिल्लर झाली भेंच्योद . भुकेल्या कुत्र्यांना भुलवणारं खरकटं , आता खरा माल कमवायचाय मला !

200.00 Add to cart

टेरर इन इस्लामाबाद


[taxonomy_list name=”product_author” include=”4240″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


टेरर इन इस्लामाबाद पाकिस्तानातल्या भारतीय दूतावासात सांस्कृतिक अधिकारी म्हणून काम करताना वीरसिंग भारताचा गुप्तचर एजन्ट म्हणूनही काम करत असतो . वीरसिंग एजंटकडे गुप्तचर विभागाने सीक्रेट मिशन सोपवलेलं असतं . तो ते फार सावधपणे पार पाडत असतो…
आता त्याची भारतात परत जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली असतानाच… अचानक एका रात्री त्याला पकडण्यात येतं… पाकिस्तानच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांकडून ही कारवाई झाली असते ! तिथून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रश्नच नसतो, प्रश्न असतो तो दुश्मनांच्या त्या प्रदेशात वीर आपली गुपितं , माहिती आणि सोर्सेस यांचं संरक्षण कसं करणार ? तो त्यात यशस्वी होणार का ?

थरारक आणि स्वानुभवातून उतरलेली इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणारी कथा… टेरर इन इस्लामाबाद !


लेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.




200.00 Add to cart

दृष्टी


[taxonomy_list name=”product_author” include=”4238″]


आम्ही चौघंही अंध आहोत. कबुल आहे. पण ठरल्याप्रमाणे आज आम्हाला अलिबागचा किल्ला बघायचाय. उद्या मुरूडचा जंजिरा बघायचाय. तुम्ही दाखवू शकत नसलात तर सांगा, आम्ही आमची सोय करू. आम्हाला हातपाय आहेत. धडधाकट शरीर आहे. आम्ही चालू शकतो, पोहू शकतो. आम्ही स्वतः बघू ना दोन्ही किल्ले !

एक सागरी किल्ला… एक सागर… एक वादळ… आणि चार अंध !



200.00 Add to cart

सायड

 


रवींद्र पांढरे


प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते…
दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’.
शांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं,आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण…
 प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची -‘जामनेरी बोलीतली कादंबरी सायड !

200.00 Add to cart

मी जयुराणा

…माझी ‘मनोहरी’ कहाणी


जयश्री मनोहर

शब्दांकन : साहिल कबीर


बापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.

वाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…
डॉ. गीताली वि.म.


 

200.00 Add to cart

का चिंता करिशी

चिंतामुक्तीसाठीचा हमखास मार्ग


डॉ.राजेंद्र बर्वे


सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे तणाव, भीती, नैराश्य, चिंता, काळजी या समस्या घराघरात जाऊन पोचल्या आहेत.

आपल्या आयुष्याचा मोठा भाग अशा चिंतातुर भावनांनी व्यापलेला असला तरी, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ध्यायला हवी ती काळजी घेत नाही आणि समस्या वाढल्यावर मात्र हताश होऊन जातो.

ताणतणाव, मानसिक आजार याकडे डोळसपणे बघितल्यास अनेक समस्या वेळेत टाळता येऊ शकतात.

डॉ. राजेंद्र बर्वे गेली अनेक वर्ष मानसतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चिंता आणि काळजी अशा विकारांवर मात करण्यासाठी त्यांनी अतिशय सहज सोप्या भाषेत आणि अभ्यासपूर्ण केलेलं मार्गदर्शन म्हणजेच हे पुस्तक.

या पुस्तकात मार्गदर्शन करताना डॉ. बर्वे स्वाध्याय, सराव आणि केस स्टडीज् या माध्यमांचाही वापर करतात तसंच वाचकाला पूर्णपणे वाचनप्रक्रियेत सामावून घेतात.

त्यामुळे वाचक ‘केवळ वाचलं आणि सोडून दिलं’ असं न करता पुस्तकात दिलेल्या कृतिसत्राद्वारे मनापासून सहभागी होतो आणि आपल्या संत्रस्त मनस्थितीतून सकारात्मकपणे बाहेर पडतो.

हे पुस्तक वाचा, सराव करा आणि मग तुम्ही स्वतःलाच विचाराल…
का चिंता करिशी ?

 

200.00 Add to cart

माइंडफुलनेस

वर्तमानक्षणात जगण्यासाठीची ‘पूर्णभान’ संकल्पना.


डॉ.राजेंद्र बर्वे


सोशल मीडिया आणि समाजातील वाढती झुंडशाही, हव्यासांचे इमले, ताणतणावांची चढती भाजणी, यांमुळे मनाच्या एकाग्रतेवर, स्थिरतेवर आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर परिणाम होत आहे. आज प्रत्येकाच्या मनाला गरज आहे ती पूर्णभानाने जगण्याची, अर्थात माइंडफुलनेसची!

पूर्णभान म्हणजे अस्तित्त्वाची वर्तमानातील लख्ख जाणीव… पूर्वग्रह आणि निवाडा छेदून जाणवणारी उत्साही व लक्षपूर्वक जोपासलेली मनोवृत्ती… सभोवतालासकट स्वतःचा केलेला बिनशर्त स्वीकार. अशी जागती जाणीव स्वतःमध्ये निर्माण करायची तर, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि नेटकं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हे साध्य करण्यासाठी गप्पाटप्पा, व्यक्तिगत समायोजन, प्रश्नोत्तरं, कविता-गाणी आणि अशा आनंदयात्रेतून पूर्णभानाचं प्रशिक्षण देत आहेत सुधार्य डॉ. राजेंद्र बर्वे.

आत्ताचा क्षण आनंदाने आणि समस्यामुक्तपणे जगण्याचा मंत्र देणारं पुस्तक माइंडफुलनेस.



200.00 Add to cart

माणसांच्या गोष्टी

 


डॉ. छाया महाजन


माणसांच्या गोष्टी

आपल्या अवतीभवती अनेक अनेक ढंगांची, अनेक वृत्ती-प्रवृत्तींची माणसं वावरत असतात. आयुष्याच्या लढाईत आपापल्या परीने सामोरे जाणारे हे चेहेरे, काही हरून गेलेले, काही पिचलेले, काही उमदे, काही नियतीशी तडजोड करणारे, तर काही लढायला उभे ठाकलेले… असे विविध चेहेरे या कथासंग्रहात आपल्याला भेटत राहतात.

डॉ. छाया महाजन यांनी हे चेहरे विविध प्रसंगांतून, निवेदनातून आणि पात्रांमधून साकारले आहेत. रजनी, आसावरी, अमांडा, वसुधा, वच्छी अशा व्यक्तिरेखांमधून मानवी स्वभावाचे कंगोरे, त्याची जीवनावरची आसक्ती आणि नात्यांच्या गहियऱ्या छटा या कथासंग्रहात लेखिका सशक्तपणे रेखाटते.

मानवी नात्यांची वीण उलगडून दाखवणाऱ्या पंधरा कथा… माणसांच्या गोष्टी.


200.00 Add to cart