पॉल गोगँ एक कलंदर कलाकार

 


माधवी मेहेंदळे


मॉडर्न आर्टचा जनक पॉल गोगँ…. एक जगप्रसिद्ध प्रतिभावान कलाकार….. सिम्बॉलिझम, सिंथेटिझम, क्लाइझोजिनम अशा चित्रकलेतील विविध शैली त्याने विकसित केल्या आहेत. चित्रकलेसोबतच त्याने शिल्पकला (Sculpture), काष्ठशिल्प (Woodcraft), सिरॅमिक या माध्यमांतूनही त्याने प्रचंड निर्मिती केली आहे. अनेक समकालीन चित्रकारांमध्ये गोगँने स्वतःची वैशिष्ट्यं राखली आणि एवढंच नव्हे तर, पिकासोसारख्या कलाकारावरही गोगँच्या चित्रकलेचा प्रभाव दिसून येतो.

या पुस्तकात लेखिका डॉ. माधवी मेहेंदळे यांनी गोगँच्या एकंदर कलाप्रवासाचा आणि कलावैशिष्ट्यांचा मागोवा घेतला आहे. त्यातील अनेक पैलू उलगडले आहेत. कलाविश्वातील त्याच्या मुशाफिरीसोबतच पुस्तकात त्याच्या वैयक्तिक जीवनाचा, नातेसंबंधांचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि मनस्वी स्वभावाचाही धांडोळा घेतला आहे. ताहिती बेटावरील वास्तव्य हा गोगँच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय… त्याचेही तपशील पुस्तकात सापडतील.

पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे गोगँच्या कलावैशिष्ट्यांची वाचकांना प्रचिती यावी यासाठी पुस्तकात अनेक तपशिलांसह समाविष्ट केलेली रंगीत चित्रं. चित्रकलेच्या इतिहासात ‘माइल स्टोन’ ठरलेल्या कलाकाराचा सर्वांगीण धांडोळा घेणारं पुस्तक पॉल गोगँ : एक कलंदर कलाकार


 

500.00 Add to cart

मी जयुराणा

…माझी ‘मनोहरी’ कहाणी


जयश्री मनोहर

शब्दांकन : साहिल कबीर


बापू आणि मालिनी यांची ‘मॅनलीवुमन’ असलेली जयुराणा आणि मनोहर यांची जयु… तिच्या आठवांचा हा जागर ! ‘हजारो फुलं बहरू दे’ हा स्त्री चळवळीचा नारा बुलंद करणाऱ्या जयुराणा म्हणजे एक अजब रसायन आहे. आरामात राम नाही आणि दामही नाही, असं म्हणत त्यांनी केलेल्या कष्टाचा, श्रमाचा गंध या आत्मकथनात दरवळत राहतो. माणसांशी गोडवा टिकवणारी माणुसकी, प्रेम आणि प्रामाणिकपणाला सतत महत्त्व देणारी जगण्याची तत्त्वं समान असणारं सासर-माहेर मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर कसं झालं याचा हा आलेख खरोखरच मनोहारी आहे.

वाद, भांडण, भीतीच्या पल्याड जाऊन केवळ प्रेम आणि विश्वास यांवरच आपण जिंकू शकतो, ती प्रेमभावना निरागस ठेवत, समजून घेत निबिड अंधारातही उजेडाची प्रकाशरेषा उमटवू शकतो! ही प्रकाशरेषा म्हणजे अस्सल जगण्याचा स्रोत यावर अपार विश्वास ठेवत त्यांनी अखंडपणे माणसं जोडली. दोन महिन्यांच्या माधुरीचा इवलासा जीव भुर्र उडून गेल्यावरचा काळीज-कल्लोळ आणि आत्मिक पूर्तता झालेला सुधारक पुरुष मनोहर यांचा स्वेच्छा मरणाचा निर्धार ऐकल्यावर झालेला जीवाचा थरकाप त्यांनी धीरोदात्तपणे पेलला. जीवे साहिलेल्या या टोकाच्या मरण वेणांनंतर दुःख-गुंत्यातून स्वतःला पार करत त्या सुखाचा धागा शोधत राहिल्या. माणसं जोडतच राहिल्या. या जयुराणाचा जीवनविषयक व्यापक दृष्टिकोन आत झिरपत सहजपणे त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतोय… माणूसमळा जपला जातोय…
डॉ. गीताली वि.म.


 

200.00 Add to cart

हिराबाई बडोदेकर


गायनकलेतील तारषड्ज


[taxonomy_list name=”product_author” include=”4456″]


ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची.

सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर.

डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल !

– डॉ. चैतन्य कुंटे



 

325.00 Add to cart

MY BARC DAYS


[taxonomy_list name=”product_author” include=”4222″]


My BARC Days is a memoir of Dr. Suresh Haware’s inspirational journey from a remote village in India to becoming a nuclear scientist in India’s premier research organization Bhabha Atomic Research Centre (BARC). The book brings forth the author’s perspective of looking at difficulties as challenges and opportunities, and his intense passion for knowledge and research. His experiences span political events that affected the common man in India, days spent in educational institutions, work in BARC and also a Himalayan pilgrimage. Through detailed descriptions, the book gives a thorough understanding of life and work at BARC including a few milestones in the nation’s nuclear journey.


 

399.00 Add to cart

एक होती रितू…


रितू नंदाची अविस्मरणीय कहाणी


[taxonomy_list name=”product_author” include=”499″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”404″]


रितू नंदा…..

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी…. पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही…

हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे.

सुप्रसिद्ध संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य, जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक सुहृद यांना बोलतं करत तिचं असामान्य कर्तृत्व,

व्यक्तिमत्त्वातले अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे…. यातूनच समजतं….

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वतः एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती.

तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू…



300.00 Add to cart

शिखरावरून


[taxonomy_list name=”product_author” include=”4237″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”497″]


शिखरावरून.. 
एडमंड हिलरी म्हणजे शेर्पा तेनसिंगसह उत्तुंग एव्हरेस्ट शिखर सर करणारे साहसवीर !
‘एव्हरेस्ट’ व्यतिरिक्त त्यांनी
■ स्नो – कॅट ट्रॅक्टरने दक्षिण ध्रुवावर यशस्वी मार्गक्रमण
■ उत्तर ध्रुवावर रोमहर्षक मोहीम
■ जेट बोटीने बंगालच्या उपसागरातून गंगा नदीचा भाग काढत तिच्या उगमापर्यंत जाण्याचा अचाट उपक्रम…

अशी मानवाला अशक्यप्राय वाटणारी अनेक साहस – शिखरे गाठली. व्यक्तिगत जीवनातही दुःखाचे डोंगर पेलणाऱ्या मृदु – निर्मळ हिलरी यांनी मानवतेचा ओलावा जीवनभर जोपासला. भारताशी अतूट नातं जोडणाऱ्या न्युझिलंडवासी हिलरींनी हिमालयातील लोकांसाठी जे कल्याणकारी कार्य हाती घेतले, ते आजतागायत सुरू आहे. भारतप्रेमी हिलरींनी भारतात ‘हायकमिशनर’चे पदही भूषविले. त्यांच्या साहसी उपक्रमांची माहिती देणारी, त्यांचे रोमहर्षक अनुभव कथन करणारी आणि त्यांचे सार्थ व्यक्तिगत जीवन उलगडणारी ही त्यांची ‘आत्मगाथा’ शिखरावरून !




350.00 Add to cart

माझ्या धडपडीचा कार्यनामा

उद्योग, व्यवस्थापन… लेखन, समाजकार्य… एक उद्बोधक मुशाफिरी!


[taxonomy_list name=”product_author” include=”3805″]


माझ्या धडपडींचा कार्यनामा ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ सारख्या प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमधून साठ – सत्तरच्या दशकांत विद्यार्थी म्हणून घडताना, एक तरूण भवतालच्या समाजाकडेही संवेदनशीलतेने बघत होता…. तर करियर घडवताना, लठ्ठ पगाराच्या विळख्यात अडकून नोकरी एके नोकरी न करता विविध क्षेत्रांत कल्पक संकल्पनांचा अवलंब करत होता… अनेक प्रयोग करत खऱ्या अर्थाने कार्यरत होता. मॅनेजमेन्ट क्षेत्रातील गुरू आणि सामाजिक चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ता अशा दोन ध्रुवांवरच्या भूमिका निभावत विधायक काम करू पाहणारा हा धडपड्या म्हणजे आनंद करंदीकर..
‘इंडसर्च’ या प्रसिद्ध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या स्थापनेमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे . ‘मेट्रिक कन्सल्टन्सी लि.’  ही भारतातील अव्वल दर्जाची मार्केट रिसर्च आणि कन्सल्टन्सी फर्म त्यांनी दूरदृष्टी ठेवून उभारली. या कंपनीच्या माध्यमातून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील युवकांमधील कौशल्य विकसित करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. सामाजिक कामाच्या आघाडीवर ‘युक्रांद’ , ‘जनवादी महिला संघटना’ , ‘लोकविज्ञान संघटना’ अशा संघटनांसोबत अनेक संघर्षात्मक आणि विधायक कामं त्यांनी केली. या पुस्तकात त्यांनी आपल्या अशाच अनेक धडपडींना स्वतःच्या खास शैलीत शब्दबद्ध केलं आहे. हे सर्व कार्यानुभव वाचतांना जाणवते ती त्यांची काम करण्याची तळमळ, कामाकडे बघण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, कमालीची कल्पकता आणि अचंबित करणारा उत्साह !
एका प्रसिद्ध कवीचा मुलगा ही ओळख मागे टाकत दोन टोकांवरच्या प्रवासातील उड्या घेत केलेल्या आनंदी धडपडीचा हा प्रामाणिक लेखाजोखा … अर्थात माझ्या धडपडीचा कार्यनामा !

 

340.00 Add to cart

मिट्ट काळोख …लख्ख उजेड

एक व्यसनी गर्दुल्ला ते सफल जीवन…

दत्ता श्रीखंडेचा स्तिमित करणारा जीवन प्रवास


[taxonomy_list name=”product_author” include=”3976″]


उजड काळोख्या वाटेवरून प्रवास करता करता प्रकाशाचे किरण दिसू लागतात काय आणि तो प्रवास एक एक अकल्पनीय वळसे घेत घेत उजेडाकडे झेपावतो काय…. लहानपणापासून दत्ता श्रीखंडेला असलेल्या व्रात्य सवयी अधिक व्रात्य संगती … त्याला जोड दुर्दैवी प्रसंगांची आणि प्रतिकूल परिस्थितीच… मग घरून पळून जाणं, कमाईसाठी लहान-सहान कामं करणं , तिथले खचवून टाकणारे अनुभव घेणं हे सर्व अपरिहार्यपणे आलंच. त्यातूनच मग दत्ता अवैध धंद्यांतील नोकरीत गुरफटत जातो आणि नकळतपणे अधोविश्वात प्रवेश करतो. चोऱ्या, पाकीटमारीचे धंदे, दारू – गर्दच्या व्यसनांचा विळखा, जेलच्या वाऱ्या अशा न संपणाऱ्या दुर्दैवी फेऱ्यांत दत्ता अडकून जातो . काळोख्या गल्ल्यांमधून प्रवास करता करता मिट्ट काळोखाच्या हमरस्त्यावर जाऊन पोचतो… पण एके दिवशी त्याला’ मुक्तांगण’ नावाचं मोकळं पटांगण सापडतं… आणि त्याला स्वतःमधल्याच नवीन दत्ताचा शोध घेण्याची संधी मिळते. मग सुरू होतो लख्ख उजेडाकडे जाण्याचा त्याचा प्रवास !

थक्क करणारी आत्मकथा – मिट्ट काळोख … लख्ख उजेड !



 

375.00 Add to cart

नरसिंहावलोकन

भारताच्या अर्थव्यवसथेचा कायापालट करणाऱ्या पी.व्ही. नरसिंह राव याचं राजकीय चरित्र


[taxonomy_list name=”product_author” include=”3808″]

अनुवादक [taxonomy_list name=”product_author” include=”351″]


पी.व्ही . नरसिंह राव अनपेक्षितरीत्या १ ९९ १ साली भारताचे पंतप्रधान झाले , तेव्हा त्यांच्याकडे आर्थिक संकटात पडलेल्या व हिंसक आंदोलनांनी ग्रस्त झालेल्या देशाची सूत्रं आली . त्यांचा पक्षही तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हता.

संसदेत त्यांचा पक्ष अल्पमतात होता , शिवाय त्यांना ‘१० , जनपथ ‘ च्या सावलीत सत्ता चालवावी लागत होती . आणि तरीही राव यांनी भारताला देशात व परदेशात नवी ओळख मिळवून दिली . जगातील मोजक्याच नेत्यांनी इतकी कमी सत्ता असताना इतका मोठा बदल घडवून आणलेला दिसतो.

राव यांच्या यापूर्वी कधीच प्रकाशात न आलेल्या खाजगी कागदपत्रांचा अभ्यास करून आणि शंभरहून अधिक मुलाखती घेऊन विनय सीतापती यांनी हे चरित्र लिहिलं आहे . भारतीय अर्थव्यवस्था , आण्विक कार्यक्रम , परराष्ट्र धोरण व बाबरी मशीद अशा विविध मुद्द्यांवर या चरित्रातून नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे . तेलंगणातील एका गावातून केंद्रीय सत्तेपर्यंतचा आणि तिथून पुन्हा अपमानित निवृत्तीपर्यंतचा राव यांचा जीवनप्रवास रेखाटताना ,या पुस्तकात त्यांच्या आंतरिक खळबळीचीही दखल घेण्यात आली आहे . त्यांचं तणावदायक बालपण , त्यांचे भ्रष्ट व्यवहार व प्रेमसंबंध, त्यांचा सततचा एकाकीपणा यांचीही नोंद हे पुस्तक घेतं.

एका प्रतिभाशाली राजनीतीज्ञाची अकथित कहाणी… नरसिंहावलोकन!



 

375.00 Add to cart

ऋणानुबंध (डिलक्स आवृत्ती)

भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं, घडलेल्या घटना…


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर मौलिक असे काही छंद आणि काही श्रध्दा मिळून जातात.
वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.

म्हणूनच…
अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ‌ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबध्दही…


300.00 Add to cart

भूमिका (डिलक्स आवृत्ती)


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


यशवंतराव चव्हाण – महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल.
केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल.
महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक… भूमिका


300.00 Add to cart

कारेनामा (डिलक्स आवृत्ती)


[taxonomy_list name=”product_author” include=”1728″]


औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्‍या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.

 

295.00 Read more

KARENAMA (Hard Bound)

 


[taxonomy_list name=”product_author” include=”1728″]


ADVANCESS IN SCIENCE AND MEDICINE HAVE FACILITATED SIGNIFICANT IMPROVEMENT IN HEALTHCARE. TODAY PEOPLE LIVE LONGER AND HEALTHIER. MEDICINES HAVE BECOME AN INTEGRAL AND VITAL PART OF OUR LIVES. YET. FEW OF US WONDER WHAT GOES INTO THEIR DEVELOPMENT AND MANUFACTURING. THE YOUNG LAD WHO HAD ONCE PRAYED TO THE LORD THAT PEOPLE USE MEDICINES FROM HIS FAMILY SHOP AND RECOVER, IS TODAY THE CHAIRMAN & MANAGING DIRECTOR OF INDOCO REMEDIES LTD., A FIVE HUNDRED CRORE PHARMACEUTICAL COMPANY. KARENAMA’ IS THE STORY OF SURESH KARE’S STRUGGLE IN TRANSFORMING INDOCO FROM A SICK PHARMA COMPANY INTO A UNIVERSALLY KNOWN AND PROFESSIONALLY DRIVEN ORGANIZATION. THE BOOK COMPRISES OF SHORT STORIES AND INCIDENTS IN SURESH’S LIFE THAT MOULDED HIS PERSONALITY AND MADE HIM THE VISIONARY THAT HE IS TODAY. IT TALKS OF HOW A BOY FROMA SMALL TOWN IN GOA, ARMED WITH HIS FATHER’S PRINCIPLES AND MOTHER’S VALUES, MADE IT BIG IN MUMBAI. *KARENAMA’ TELLS THE STORY OF ONE MAN’S SUCCESS AND THE SUCCESS OF HIS ENTERPRISE THAT WOULD INSPIRE MANY AN ENTREPRENEUR, PROFESSIONAL OR EVEN THE AVID READER.


295.00 Add to cart

स्पर्धा काळाशी (डिलक्स आवृत्ती)

भाषणे व मुक्त संवाद


[taxonomy_list name=”product_author” include=”533″]


आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण कार्यक्रमास १९९१ साली आम्ही जो प्रारंभ केला त्या संदर्भात शरदजींच्या असलेल्या बांधीलकीचे मला या ठिकाणी स्मरण होते. किंबहुना आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी १९८०च्या दशकात राजीव गांधी यांनी उचललेल्या अनेक धाडसी पावलांना शरदजींनी पाठिंबाच दर्शविला होता.
महाराष्ट्राच्याही पलीकडे राजकारण आणि सार्वजनिक जीवनाच्या प्रांतात — राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापक अनुभव शरदजींच्या गाठीशी आहे. प्रस्तुत ग्रंथात संकलित केलेल्या त्यांच्या विचारांमध्ये त्या अनुभवांचे प्रतिबिंब स्वाभाविकपणेच डोकावते. अनेक बाबतीतील त्यांच्या भूमिकेशी सुसंवादी अशीच माझी भूमिका असते. विशेषत: आर्थिक धोरण, सातत्यशील विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक बाबी यांचा निर्देश या संदर्भात करता येईल. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपयोजन राष्ट्रीय विकासासाठी करण्याबाबत दृढबांधीलकी असणार्‍या आमच्या काही अत्यंत प्रगल्भ नेत्यांमध्ये शरदजींची गणना होते. एक आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास येऊ शकतो, या त्यांच्या मताशी मी सहमत आहे.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग


500.00 Add to cart

अनासक्त कर्मयोगी

( कै . गो . ना . अक्षीकरांचे चरित्र )

[taxonomy_list name=”product_author” include=”3264″]


अनासक्त कर्मयोगी ‘ या चरित्राचे लेखक श्री श्रीकृष्ण केशव अक्षीकर हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील शिक्षण विभागातून सहसचिव या सन्मान्य पदावरून सेवानिवृत्त झालेले राजपत्रित अधिकारी आहेत . ते एक चांगले ललित लेखकही आहेत . आजवर त्यांची ‘ कन्सल्टिंग रूम ‘ केशव अक्षीकर ‘ आदरांजली ‘ , ‘ अशी ( ही ) माणसं ‘ , ‘ माझ्या मनातलं ‘ व ‘ रिकामपणाचे उपद्व्याप ‘ ही पाच ललित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी एके काळी ‘ सुगत ‘ या नावाने वासंतिक व दिवाळी अंकांचे संपादनही केले होते . या चरित्राचे नायक कै . गो . ना . अक्षीकर यांचे ते नातू आहेत . टिळक – आगरकरांच्या अध्यापनाचा लाभ घेत त्यांच्याच ‘ राष्ट्रीय ‘ शाळेतून मॅट्रिक झालेल्या कै . गो . ना . अक्षीकरांनी आपल्या या गुरुद्वयाकडून शिक्षणप्रसाराचा संस्कार कसा घेतला ; दादर , ठाणे व कल्याण या एके काळच्या मागासलेल्या ‘ खेड्यां मध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी कशा शाळा काढल्या , त्या काळात शिक्षणक्षेत्रात दुर्मीळ असणाऱ्या ‘ रात्रशाळा ‘ व ‘ इंडस्ट्रियल स्कूल ‘ या संकल्पना कशा प्रत्यक्षात आणल्या , हे सर्व करीत असताना देणग्यांवर अवलंबून न राहता स्वत : च आर्थिक पदरमोड कशी केली , यश , कीर्ती , नाव आणि स्वतःचे छायाचित्रही यांपासून ते निष्ठेने कसे अलिप्त राहिले , यांचे एक हृद्य व प्रेरणादायी चित्र या चरित्रात पाहवयास मिळते . योगायोगाने कै . गो . ना . अक्षीकर सुवर्णजयंती वर्ष आणि त्यांनीच स्थापन केलेल्या दादर – मुंबईच्या छबिलदास शाळेची शतकोत्तर रजतवर्षपूर्ती या २०१४ त येणाऱ्या दोन मंगल मुहूर्ताच्या उंबरठ्यावर हे चरित्रपुस्तक प्रकाशित होत आहे . याच्या वाचनाने शिक्षणक्षेत्रातील मंडळींना कार्यऊर्जा प्राप्त व्हावी आणि विद्यार्थ्यांवर ध्येयासक्ती व अनासक्तीचा संस्कार व्हावा , हीच एक इच्छा .

– डॉ . द . दि . पुंडे


125.00 Add to cart

लोकप्रिय चित्रतरिका

 

[taxonomy_list name=”product_author” include=”3258″]


या लोकप्रिय अभिनेत्रीचं बालपण , त्यांची जडण – घडण , त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात आलेले चढ – उतार , यश – अपयश याचा पट वेधकरित्या उलगडून दाखवला आहे डॉ . शुभा चिटणीस यांनी , त्यांना प्रत्यक्ष भेटून , त्यांच्याशी संवाद साधून !


125.00 Add to cart
1 2 4