लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख हे निवृत्त प्रशासकीय IAS अधिकारी

२०१८मध्ये बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांची आजवर एकतीस मराठी, पाच इंग्रजी व दोन हिंदी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आजही त्यांचा लेखनप्रवास अव्याहतपणे चालू आहे.

त्यांना राज्य शासनाचे तीन, महाराष्ट्र साहित्य परिषद-पुणेचे पाच

महाराष्ट्र साहित्य परिषद-औरंगाबादचे दोन आणि अन्य वाङ्मयीन

संस्थांचे विविध साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

'भारतीय संविधान' हा त्यांचा श्रद्धेचा तसेच अभ्यासाचा विषय व ते विचार आपल्या दैनंदिन जीवनात जगण्याचा प्रयत्न... मुस्लिम समाज व त्यांचं जीवन, उर्दू भाषा, LGBTQ समाजाचं जगणं व त्यांचे प्रश्न समजून घेणं, आंतर भारतीच्या विचारांचा प्रसार आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणं हे देशमुखांच्या आजच्या जगण्याचा अपरिहार्य भाग झाले आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सक्तीने मराठीचा कायदा

मंजूर करून घेण्यात पुढाकार.....

मराठी भाषा विद्यापीठ आणि मराठी भाषा विकास प्राधिकरण

कायद्यासाठी पाठपुरावा...

'मराठीच्या भल्यासाठी' या मराठीच्या विकास करणाऱ्या

संस्थेचे कार्याध्यक्ष.... अशा सर्व विधायक कामात गर्क राहता राहता देशमुख बॅडमिंटन व टेबल टेनिस या खेळांची आवड जोपासतात... खेळ-खेळाडू यांच्याविषयी आत्मीयता बाळगतात आणि त्यांचं जीवनचरित्र वाचण्यात रस घेतात. त्याचप्रमाणे बॉलिवूड स्टार्स, गोल्डन इराचं फिल्म संगीत, संगीतकार, गीतकार यांत मनापासून रमतात.

लेखकाची पुस्तकं

गांधीवादाचा केमिकल लोचा आणि इतर कथा


लक्ष्मीकांत देशमुख


लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे.

भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो.

एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे.

– आसाराम लोमटे


 

295.00 Add to cart