अरुण गांधी

अरुण गांधी यांचा जन्म १९३४ साली दक्षिण आफ्रिकेत झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना भारतात त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्यासोबत राहण्यास पाठवण्यात आले. गांधीजींबरोबर ते तेव्हा अठरा महिने राहिले. अर्थातच त्या दरम्यान गांधीजींच्या अहिंसेच्या राष्ट्रीय मोहिमेचे ते साक्षीदार होते. नंतर १९५७ साली भारतात परतल्यानंतर ते 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम पाहू लागले. आपली पत्नी सुनंदा हिच्या साथीने त्यांनी 'सेंटर फॉर सोशल युनिटी' या संस्थेची स्थापना केली. तसेच इ.स. १९९१मध्ये या उभयतांनी टेनेसी येथे ‘एम. के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉन व्हॉयलन्स' या संस्थेची स्थापना केली.

लेखकाची पुस्तकं

कस्तुरबा : शलाका तेजाची


[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !



195.00 Add to cart