आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अॅसिडस् शरीराला आश्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा... ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.